Tiware Dam Broken | चिपळूणमधील तिवरे धरण नक्की आहे तरी कुठे? | रत्नागिरी | ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. तर तीन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement