अहमदनगर : जिल्ह्यात भाजपचा प्रवेश झालाच कसा? शरद पवारांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2018 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लाट बावट्याचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा प्रवेश झालाच कसा असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कॉम्रेड पी.बी. कडू यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. आगामी काळात नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वासही शरद पवारांनी बोलून दाखवला. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली. दरम्यान, यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचा समाजक्रांती पुरस्काराने गौरव करण्यात आला.