गुजरात निवडणूक निकाल : जनतेचा कौल स्वीकारतो, राहुल गांधींचं ट्वीट
Continues below advertisement
काँग्रेसनं गुजरातमध्ये कडवी झुंज दिली, त्यामुळ पराभवामुळं मी निराश नाही,अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. गुजराती जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. गुजरातबरोबरच हिमाचलच्या जनतेचा मी आभारी आहे., असंही त्यांनी म्हटलंय. मतदारांनी सभ्यता आणि धैर्य दाखवून इतरांची तोंड बंद केलीत, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Continues below advertisement