पुणे: जिल्हाधिकारी कार्यलयासमोर वारकऱ्यांचं भजन करत आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2018 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर वारकऱ्यांनी भजन करत आंदोलन केलंय. भामचंद्र आणि भंडारा डोंगर अखंड संरक्षित ठेवा अशी वारकऱ्यांची मागणी आहे. पुण्या जवळील भामचंद्र डोंगरावर तुकाराम महाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तसंच भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचं वास्तव्य होतं आणि तिथे त्यांनी ग्रंथसंपदेचा अभ्यास केला आहे.. पण या डोंगरांवर आता विकासकामं सुरु झालीत.त्यामुळे डोंगरांना सुरुंग लावला जात आहे. असा आरोप वारकऱ्यांनी केलाय. विकास कामाच्या नावाखाली जे बांधकामं सुरू आहेत त्यामध्ये डोंगरांवरची जैवविविधता आणि ऐतिहासिक ठिकाणं नष्ट होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय.