पुणे : आजपासून बारावीची परीक्षा, मात्र शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

Continues below advertisement
१२ वी च्या परीक्षेला आजापासून सुरुवात होत असताना दुसरीकडे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे यंदाच्या १२ वीचा निकाल जर लांबणीवर पडला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असंही या शिक्षकांनी स्पष्ट केलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या वेतनवाढीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत.  याआधी ३ फेब्रुवारीला शिक्षकांनी बहिष्कार आंदोलन तातपुरतं स्थगित केलं होतं. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्यानं शिक्षकांनी पुन्हा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram