पुणे : कुणाच्याही हातून पुरस्कार स्वीकारला, तरी किंमत कमी होत नाही : नाना पाटेकर
कुणाच्याही हातून जरी पुरस्कार स्वीकारला, तरी त्याची किंमत काही कमी होत नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कारांच्या संदर्भात झालेल्या वादावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यास काही पुरस्कार विजेत्या कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. त्यावर पुण्यातील संवाद-मराठी चित्रपट संमेलनात नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.
राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यास काही पुरस्कार विजेत्या कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. त्यावर पुण्यातील संवाद-मराठी चित्रपट संमेलनात नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.