पुणे : ..तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह मंत्रालयाला घेराव घालू : अजित नवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील दूध उत्पादकांचं आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे. सरकारने 9 मेपर्यंत ठरल्याप्रमाणे प्रतिलिटर 27 रुपये भाव न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे.
यासाठी राज्यभर दौरा करुन शेतकऱ्यांना संघटित केलं जाणार आहे. आणि त्यानंतर लाँग मार्चही काढण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 17 किंवा 18 रुपये प्रति लिटर दराने दूध विकत घेतलं जातं. एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च 37 रुपये आहे. पण सरकारने स्वत:च ठरवल्याप्रमाणे किमान 27 रुपये प्रति लिटर भाव तरी द्यावा, अशी मागणीही अजित नवलेंनी केली आहे.
यासाठी राज्यभर दौरा करुन शेतकऱ्यांना संघटित केलं जाणार आहे. आणि त्यानंतर लाँग मार्चही काढण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 17 किंवा 18 रुपये प्रति लिटर दराने दूध विकत घेतलं जातं. एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च 37 रुपये आहे. पण सरकारने स्वत:च ठरवल्याप्रमाणे किमान 27 रुपये प्रति लिटर भाव तरी द्यावा, अशी मागणीही अजित नवलेंनी केली आहे.