नेत्यांची नौटंकी, पुणे आणि कोल्हापुरात कचरा नाही तिथे स्वच्छता अभियान

Continues below advertisement
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्तानं देशभर स्वच्छता अभियान राबवलंय जातंय. मात्र महाराष्ट्रात काही नेत्यांकडून नौटंकी सुरु असल्याचं दिसतंय.
विशेष करुन पुण्यामध्ये गांधी जयंतीच्या मुहूर्तावर महापालिकेनं स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. महापौर मुक्ता टिळक यांनी अशा ठिकाणी झाडू मारला जिथं कचराच नव्हता. त्यामुळे फक्त फोटोसाठी स्वच्छता अभियान आहे का हा प्रश्नच आहे. तर तिकडे कोल्हापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही झाडू मारला. पण इथं फक्त झाडाची वाळलेली पानं होती. त्यामुळे नेत्यांनी फक्त सोपस्कार पूर्ण केला का? असा प्रश्न पडतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram