पुणे : वढू गावातील गोविंद गोपाळ महाराजांच्या समाधीवरील छत्री बसवली

Continues below advertisement
बातमी कोरेगाव-भीमा हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या वढू गावातून....  गावातील गोविंद गोपाळ महाराज यांच्या समाधीवरील छत्री आज गावातील दोन्ही गटांनी एकत्र येऊन पुर्ववत बसवली आहे.
गावात सलोखा रहावा आणि त्याचा संदेश बाहेरही जावा यासाठी ग्रामस्थ एकत्र आले आणि पोलिसांच्या उपस्थित समाधीवरील छत्री पुन्हा बसवली.
29 डिसेंबरला या छत्रीची नासधुस झाल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता आणि याचे पडसाद पहिल्यांदा भीमा-कोरेगाव आणि नंतर संपुर्ण महाराष्ट्रात दिसून आले होते....
मात्र आता वढु गावातील ग्रामस्थांनी सामोपचाराची भुमिका घेत संपुर्ण महाराष्ट्राला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram