Yavatmal Rain : अतिवृष्टीमुळे यवतमाळमध्ये कापूस पिकाला फटका ABP Majha

यवतमाळ जिल्ह्यात सुमारे साडेचार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली... मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आधीच बोंडअळी आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यात आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठीं कोंडी झालीेय.. मागच्या वर्षी 12 हजार रुपये क्विंटलवर गेलेला कापूस यावर्षी 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपये क्विंटलवर स्थिरावलाय. कापसाचे दर वाढतील  या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक केलीये.. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे..  त्यामुळे आता बँक आणि खासगी सावकारांचं कर्ज फेडावं तरी कसं असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola