
Taliban चा सुप्रीम कमांडर अखुंदजादा अजूनही अलिप्त, कुठे आहे Hibatullah Akhundzada ?
Continues below advertisement
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध यापुढे कसे असणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. दोन दिवसांपूर्वी एबीपी न्यूजने एका एक्स्क्लुझिव्ह बातमीत सांगितले होते की भारत सरकार अफगाणिस्तानच्या नवीन तालिबान राजवटीशी संपर्क साधेल. आता तालिबाननेही भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तालिबानचे नेते मौलवी झियाऊल हक्कमल यांनी म्हटलं की, भारत आमचा शत्रू नाही आणि आम्हाला भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत असं तालिबानने एबीपी न्यूजशी खास बातचित करताना सांगितले.
Continues below advertisement