Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर तालिबान्यांकडून ताब्यात घेतलेले सर्व भारतीय सुरक्षित ABP Majha
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
21 Aug 2021 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाबूल विमानतळावर १५० भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. मात्र आता एक दिलासादायक वृत्त हाती येतंय.. काबूल विमातळावरचे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं समजतंय. दरम्यान तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलंय.. कारण तालिबानवर विश्वास ठेवणं ही घोडचूक ठरु शकते असा सल्ला सुरक्षा तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.. आता तालाबिन्यांच्या ताब्यातील भारतीय कधी सुखरुप परतणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.