Konkan Ganesh Utsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जायला ट्रेन का नाही? घूमजाव करणाऱ्या सरकारवर भाजपची टीका

दरवर्षी कोकणात जाण्यासाठी लाखो चाकरमानी कोकण रेल्वेच्या जलद आणि स्वस्त पर्यायचा अवलंब करतात. कारण एसटीची सेवा चांगल्या दर्जाची नसते आणि खाजगी बसेसच्या तिकिटांच्या किमती या आकाशाला भिडलेल्या असतात. त्यामुळेच कोकण रेल्वे हाच एक पर्याय त्यांच्यासमोर करतो. यावर्षी मात्र लॉकडाऊन असल्यामुळे 22 मार्च पासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरू होणार की नाही असा प्रश्न सर्व कोकणवासीयांना पडला होता. मात्र 7 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आणि त्यात कोकणात जाण्यासाठी गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी विनंती केली. ही बातमी आल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या शहरातील चाकरमानी गावी जाण्यासाठी तयारीला लागले होते. तिकीट काढण्यासाठी पैसे जमा करत होते. मात्र त्यांच्या या सर्व तयारीवर राज्य सरकारनेच विरजण टाकले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola