#HathrasCase हाथरसप्रकरणी पंतप्रधान मोदी गप्प का? योगी सरकारने काहीही दडवू नये - संजय राऊत

राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी काल म्हटलं होतं की, मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं, असं संजय राऊतांनी म्हटलं. हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला 'बेटी बचाओ' ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola