महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,याचिकाकर्ते विक्रम गहलोत कोण आहेत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2020 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात काल (शुक्रवार) फेटाळण्यात आली. पण ही मागणी करणारे बहाद्दर नेमके आहेत तरी कोण, महाराष्ट्राच्याच बाबतीत ते एवढे आग्रही का आहेत याचा शोध एबीपी माझाने घेतला. ज्या विक्रम गहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती ते व्यवसायाने प्रॉपर्टी एजंट आहेत. आपण कुठल्याही पक्षाची प्राथमिक सदस्यता घेतलेली नाही पण जेव्हा केव्हा आपल्याला काही चुकीचा मुद्दा दिसतो तेव्हा आपण याचिका करतो असं ते म्हणाले. दिल्लीच्या वसंत कुंजमध्ये नर्मदा कॉम्प्लेक्स या भव्य सोसायटीचे चेअरमन म्हणून देखील ते काम करत आहेत.