Maharashtra Floods | वायुसेनेच्या विमानातून पूरग्रस्तांना अन्न पोहोचवण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवार यांचा हवाई दौरा
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे. या भागातील वैनगंगा नदीची पूरस्थिती दाखवणारे ड्रोन व्हिज्युअल्स परिस्थतीची गंभीरता दाखवत आहे. वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस पडलेला नाही मात्र वैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावे पुराच्या वेढ्यात आहेत.
Continues below advertisement