#Coronavirus दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनावर कोरोनाचं सावट, विधिमंडळातील 37 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर एकही अधिवेशन पूर्णकाळ होऊ शकलेले नाही. सरकार आल्यानंतर तात्काळ हिवाळी अधिवेशन घ्यावं लागलं, त्यातही कामकाजाला कमी वेळ मिळाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी कोरोना रोगाची सुरुवात होती त्यामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आणि आता पावसाळी अधिवेशनाच्या काळात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे अवघे दोन दिवस हे अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन म्हणजे नुसती औपचारिकता आहे अशी टीका भाजपने केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola