Devendra Fadnavis | डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला,देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला. मनमोहन सिंह सज्जन व्यक्ती होते मात्र त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता, मात्र पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराची लढाई सुरु केली आणि ना खाऊंगा न खाने दुंगा हा मार्ग अवलंबला. नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिलं आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. आता दिल्लीत मंत्रालयात कुणाची लाच मागण्याची हिंमत होत नाही. कोरोना काळात महाराष्ट्रात मंत्रालयात शुकशुकाट होता, मात्र दिल्लीत मंत्रालय सुरु होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola