Bhiwandi Building Collapsed : ढिगाऱ्याखालून 20 तासांनंतर सुटका, तरुणानं मानले आभार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Building Collapsed : ढिगाऱ्याखालून 20 तासांनंतर सुटका, तरुणानं मानले आभार
Bhiwandi Building Collaps: भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात वर्धमान इमारत अचानक कोसळल्याची घटना काल (शनिवारी) दुपारी घडली होती. घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली 22 जण अडकले असून आत्तापर्यंत 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यापैकी दहा जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
भिवंडीतील वर्धमान कंपाउंडमधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही लोक इमारतीच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होतं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये भाडेतत्वावर नागरिक राहत होते.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.