तुमचा Password सुरक्षित आहे? भारतातील पासवर्ड एका सेकंदात होतात हॅक?

भारतातील अनेक नागरिक इतके सोपे पासवर्ड ठेवतात की, हॅकर्सना ते लगेच सापडतात. भारतीय नागरिकांचा सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड असलेला शब्द आहे 'पासवर्ड'. याशिवाय कृष्णा, साईराम आणि ओमसाईराम हे पासवर्डही भारतीय नागरिक सर्रास वापरतात. नॉर्डपासनं केलेल्या संशोधनात या गोष्टी समोर आल्यात. या संशोधनानुसार भारतात 200 पैकी 62 पासवर्डस असे आहेत की ते एका सेकंदाच्या आत हॅक करता येऊ शकतात. त्यामुळं लवकरात लवकर तुमचा पासवर्ड बदला. आणि तुम्ही नवा पासवर्ड असा तयार करा की जो जास्तीत जास्त सुरक्षित असेल. तशी खबरदारी तुम्हाला घ्यायलाच हवी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola