Solapur :मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावरुन 24 गावांनी मागितली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या २४ गावांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीची वेळ मागितलीय. त्यानंतर मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी कोणालाही कर्नाटकात जाण्याची गरज पडणार नाही महाराष्ट्रच तुम्हाला न्याय देईल, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. मात्र संतप्त झालेले शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येतंय.