Sanjay Raut on Lakhimpur : सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना न्याय मिळेलच; MP Snajy Raut
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी सुरू झाली आहे. या विषयावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी प्राण गमावलेल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास दर्शवला आहे. मारेकर्यांना सरकार पाठीशी घालतंय असा आरोप देखील या वेळेस राऊत यांनी मोदी व योगी सरकारवर केला आहे.