Navnath Gore | साहित्य अकादमी विजेत्या लेखकावर मोलमजुरीची वेळ,कोरोनामुळे कॉलेज बंद झाल्याने बेरोजगार
कोरोनामुळे जितके बळी गेले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने बेरोजगरीमुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले. गेले सहा महिन्यांच्या काळात झालेल्या लॉक डाऊन मुळे जगण्याचे संदर्भच बदलून गेलेत. हजारोना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर लाखोंचे लहान मोठे उद्योग डबघाईला आले आहेत. याच कोरोनामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या युवा साहित्यिकावर कुटुंबाला जगवण्यासाठी मोलमजुरीची वेळ आली आहे. सांगली जिल्ह्यातील उमदी तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील तरुण नवनाथ गोरे यांनी ही करून कहाणी आहे.