Ratnagiri : कदमांचे आरोप सुर्यकांत दळवींचे उत्तर, रामदास कदमांचे गंभीर आरोप Abp Majha

शिवसेनेपासून गेली काही वर्षे दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली आणि थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola