Ranjit Sawarkar | उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जोडे मारावेत : रणजित सावरकर | ABP MAJHA
राहुल गांधी यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये गफलत आहे. त्यांची कुठलीच वक्तव्य हे फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र सत्तेच्या राजकारणासाठी कुणीही महापुरुषांवर चिखलफेक करू नये, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली आहे. शिवसेनेने नेहमीच सावरकरांचा सन्मान केलेला आहे. यापुढेही सावरकरांच्या विरोधात जे जे बोलतील त्यांच्या विरोधात शिवसेना नेहमीच लढत राहील, अशी प्रतिक्रियाही सावरकर यांनी दिली आहे.