पुण्यात वीकेण्ड लॉकडाऊन, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वॉरंटाईन करण्याचा विचार : उपमुख्यमंत्री
पुणे : निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांनाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. "फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे," असं अजित पवार म्हणाले. तसंच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या कोरोना लसीचे डोस घेऊ नये, असं कळकळीचं आवाहन अजित पवार यांनी केलं. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
Tags :
Maharashtra Unlock Ajit Pawar Deputy Chief Minister Ajit Pawar Speech Maharashtra Lockdown Pune Unlock Pune Lockdown Lockdown In Pune Pune Weekend Lockdown Pune Lockdown Rules