Jayram Ramesh : संसदेच्या विशेष अधिवेशनावर बहिष्कार घालणार नाही, जनतेचं मुद्दे मांडणार : जयराम रमेश

Continues below advertisement

संसदेच्या विशेष अधिवेशनावर आम्ही बहिष्कार घालणार नाही तर जनतेचे मुद्दे मांडणार, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय.  काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. त्यात संसदेच्या विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय असणार आहे, असा प्रश्न विचारलाय. तसंच जातीनिहाय जनगणना करणे, अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीचीही मागणी त्यांनी केलीय. संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी विरोधक देखील तयारीला लागलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram