Raj's letter to CM | मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2020 12:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केला आहे.