महावितरणची वीज वसुली पुन्हा जोरात, वीजतोडणीच्या मुद्द्यावरून अधिवेशन संपताच सरकारचा यू टर्न!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2021 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : अधिवेशनात वीज तोडणी थांबवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र काल अधिवेशन संपताच आता महावितरणकडून वीज वसुली पुन्हा जोरात सुरु झाली आहे. अधिवेशन संपताच सरकारने यू टर्न घेतला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वीज देयकांच्या वसुलीत पिछाडीवर पडलेल्या महावितरणच्या लातूर परिमंडळ कार्यालयाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्टी आणि रजा रद्द केल्या आहेत.