Sanjay Raut | उद्धव ठाकरेंना भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही : संजय राऊत | मुंबई | ABP Majha

राज्यपालांना आम्हीही भेटलो, विनोद तावडे भेटले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस भेटले त्यांना कोणीही भेटू शकतो. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि चांगलं सरकार द्यावं असेही राऊत म्हणाले. तर भाजपचे सरकार येता कामा नये हे काँग्रेसचं मत असून त्यांच्या प्रमुख आमदारांनी याबद्दलच्या भावना कळावल्या आहेत. पण मी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असेही राऊत म्हणाले. काँग्रेस आमदारांच्या मागण्यांचं कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं सरकार यावं. मला खात्री आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत राहणार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola