Shalini Patil on Sharad Pawar | शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं : शालिनीताई पाटील | ABP Majha
अजित पवारांनी शरद पवारांशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. 'जे पेरलं तेच उगवलं, स्वत: शरद पवारांनी वसंतरावांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होत आहे', अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर 'एबीपी माझा'शी बोलताना शालिनी पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.