'महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, कोरोनासाठीच्या खर्चाचा हिशोब द्या' - राजू शेट्टी
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
04 Apr 2021 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : गेल्या वर्षी कोरोना उपाययोजनांसाठी राज्याचे संपूर्ण बजेट खर्च केले त्याचा हिशोब जनता मागत आहे. विकासकामांना कात्री लावून केलेला हा खर्च तुमच्या भ्रष्टाचारासाठी केलेला नाही, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. आज पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आले होते. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.