Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील

Continues below advertisement

Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील 
मिरा भाईंदर आणि वसई विराकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी डिसेंबरच्या शेवटी २५ तारखेपर्यंत दहिसर मेट्रो स्टेशन ते काशिगाव मेट्रो स्टेशन पर्यंतची मेट्रो सेवा सुरु होईल असं आश्वासान  परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. त्याचबरोबर भाईंदर सुभाषचंद्र बोस मैदान पासून मेट्रो पुढे वसई विरारला ही ही मेट्रो कनेक्ट होईल आणि हे काम ही येत्या दिड वर्षात होईल असा आशावाद सरनाईक यांनी दिला आहे.  प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीबाबात बोलताना, म्हटलं की, बिहारला एकनाथ शिंदे ज्या-ज्या ठिकाणी प्रचाराला गेले होते. त्या सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे अमित शाह यांनी शिंदे यांच कौतुक केलं आहे.  बिहारच्या विजयात महायुतीत प्रत्येकाचा वाटा आहे, कुणाचा सिंहाचा कुणाचा खारीचा वाटा असतो, आमचा ही खारीचा वाटा आह असा समजू, बिहार निवडणूकीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी अमित शाहना शिंदे भेटल्याच म्हणत, सध्या त्याबद्दल काही जण राजकारण करत असल्याच म्हटलं आहे. राजकारण ज्यांना करायच त्यांना करु द्या, एकनाथ शिंदे एवढे छोटे नाहीत की कार्यकर्ते पळवले म्हणू तक्रार करणार, एनडीएला बिहार मध्ये जास्त जागा मिळाल्या म्हणून आम्ही अभिनंदर करायला गेलो होतो.  एक घर एक कुटुंब असताना थोडी पेल्यातली वादळ येत असतात, परवा पेल्यातलं एक वादल आलेलं ते निघून गेलं. सर्व निवडणूका महत्त्वाच्या, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंञी देवेद्र फडणवीस यांच्या महत्त्वपूर्ण चर्चा एकमेकांचे पदाधिकारी पळवायचे नाही.   परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola