Prakash Ambedkar Sabha: इचलकरंजी येथे प्रकाश आंबेडकराची सभा, पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल

Continues below advertisement

Prakash Ambedkar : "सध्याचे सरकार डाकूंचे सरकार आहे. देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरून 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिलाय. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार ? आपली चूल देखील पेटू शकणार नाही.", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. इचलकरंजी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram