'वहिनींवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? खळबळ उडवून देणारा Narayan Rane यांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की,  मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले. 

राणे म्हणाले की,  कोकणच्या शेतकऱ्यांना माझ्या खात्याचा फायदा होईल असा प्रयत्न करणार आहे. एका महिन्याच्या आत बैठक घेऊन प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. अजून दोन दिवस दौरा आहे, आठवडा फिरून घसा बसला आहे, त्यामुळं आता जास्त बोलत नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले,'वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं?' असं म्हणत राणेंनी गौप्यस्फोट केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram