Nana Patole : महाराष्ट्रात ईडीचं सरकार, ते काहीही निर्णय घेऊ शकतात; पटोलेंची सडकून टीका

Continues below advertisement

नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रश्मी शुक्ला प्रकरणावर (Rashmi Shukla Case) बोलताना त्यांनी सांगितलं की हे प्रकरण कोर्टात आहे. पुढे बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर देखील टीका केली. राज्यात केंद्राच्या आशीर्वादाच्या भरवशावर चाललेलं सरकार आहे. राज्यात ईडी सरकार आहे, ते काहीही निर्णय घेऊ शकतं असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram