माझा विशेष | महाराष्ट्राचा सत्तापेच, शिवसेनेशिवाय कसं बनणार सरकार | मुंबई | ABP Majha
देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसंच शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही. पण शिवसेनेसाठी भाजपची दारं 24 तास खुली आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचंच सरकार स्थापन होईल ठासून सांगितलंय. त्याचबरोबर संपूर्ण भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी उभा असल्याचं सांगत शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचं काम भाजपनं केलंय.