Jitendra Awhad : Thane : वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि आयुक्तांवर हल्लाबोल
Jitendra Awhad : आगामी निवडणुकांसाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काही दिवासांपूर्वी जाहीर झाली. मागील निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होता. यंदा तीन वॉर्डचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांच्या संख्येत 131 वरून 142 पर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातल्या वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि ठाण्याच्या आयुक्तांवर हल्लाबोल केला आहे. 'माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला' असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर केला आहे.