खंडणीप्रकरणी खोटे गुन्हे दाखल, पोलिसांवर दबाव आणत तीन वर्षांनी गु्न्हा दाखल - गिरीश महाजन

जळगाव : शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवत धमकवल्याची तक्रार विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी, चोरीचा कट रचणे, सामूहिक इराद्याने गुन्हेगारी करणे असे कलम लावत गिरीश महाजन यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील असल्यामुळं हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी आज गिरीष महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola