Eknath Khadse : कन्नडी आक्रमक भूमिका घेत असतील तर महाराष्ट्राने आक्रमकता सोडलेली नाही : खडसे
कन्नडी जर आक्रमक भूमिका घेत असतील तर महाराष्ट्रातील लोकांनी आक्रमकता सोडून दिलेली नाही. महाराष्ट्रातील लोकही शांत बसणार नाही असं आव्हान एकनाथ खडसे यांनी कर्नाटक सरकारला दिलंय.. तसेच हा वाद लवकरात लवकर शांत झाला नाही तर आम्हीही शरद पवारांसोबत कर्नाटकात जावू, असा इशारा खडसेंनी केंद्र आणि राज्य सरकारला दिलाय