Eknath Khadse On Girish Mahajan : लोक मोठे झाले की बापाला विसरतात, महाजनांना एकनाथ खडसेंचा टोला

Eknath Khadse On  Girish Mahajan :  गिरीश महाजन यांना राजकारणात आपण आणले त्यांना घडविले.  हे सगळ्या जगाला माहित आहे.  मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले असल्याची जहाल टीका एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.  त्यांच्या या टिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत.  गेल्या काही दिवसांच्या पासून भाजपा नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये वॉकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.  यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करीत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे असा सवाल उपस्थित केला होता. यावर ते म्हणालेत  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola