Eknath Khadse Exclusive | कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारले : एकनाथ खडसे | ABP MAJHA
जळगाव : स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले.