Amol Mitkari : आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari on Sharad Pawar : आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. पाहा व्हिडिओ..
हे व्हिडिओ देखील पाहा
सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज-गैरसमज पसरले, पण आम्ही आघाडी धर्म पाळला; जयंत पाटलांनी मौन सोडलं
Sangali Lok Sabha Election 2024: सांगली : राज्यातील (Maharashtra News) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्यात मतदार राजानं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला. अशातच लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरुन (Sangali) महाविकास आघाडीमधली धुसफुस समोर आली होती. ठाकरेंनी चर्चा सुरू असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. पण याच सांगलीचा तिढा वाढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती. सांगलीतील तिढा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता याच चर्चांवर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "शरद पवार यांच्या प्रभावामुळे गेम पलटला आणि लोकसभेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं. सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज पसरत गेले. पण, सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. वेगळी कृती केली असती, तर काँग्रेस-शिवसेना दुखावली गेली असती."