Abhijit Karande Center Point :13 : Arvind Kejriwal यांना का आठवले गणपती आणि लक्ष्मी?
Abjijit Karande Center Point 13 : आता ही सगळी रणधुमाळी बघितल्यावर तुम्हाला कुठेतरी निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे का? अशी शंका येऊ शकते.कारण ऐन पाडव्यादिवशी जो मुद्दा सध्या किमान आत्ता चर्चेत नाहीए, तो राजकारणाच्या केंद्रस्थानी का यावा? हा प्रश्न पडला असेल. म्हणजे जसं राहत इंदोरींनी म्हटलं होतं. सरहदों पर बहुत तनाव है क्या.. कुछ पता करो कहीं चुनाव है क्या... तसं काहीसं तुम्हाला वाटलं असेल तर एकदम करेक्ट आहे. कारण आठवड्याभरात गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणाराय.आणि त्याआधी केजरीवाल यांना श्रीगणेश आणि लक्ष्मीच्या प्रतिमांची आठवण झालीय.तुम्ही म्हणाल की हा योगायोग असू शकत नाही का?