Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन होणं बंधनकारक

Continues below advertisement

गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या ठिकाणी राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंचांची बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातील 25 ते 30 गावचे सरपंचं बैठकीला हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram