वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पासेस दिलेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत - गृहमंत्री अनिल देशमुख

Continues below advertisement
सोलापूर : आषाढीच्या वारीसाठी राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपुरात प्रवेशासाठी पासेस दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जर कोणते पास जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतील तर ते कोणतेही पास ग्राह्य धरले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज कोरोनाविषयक आढावा घेण्यासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram