Mumbai Potholes | खड्डे चॅलेंजमधून 91 टक्के खड्डे बुजवल्याचा मनपाचा दावा | ABP Majha
खड्ड्यांवरून दिलेल्या चॅलेंजमधून मुंबई महापालिकेनं ९१ टक्के खड्डे बुजवल्याचा दावा केलाय. मात्र अनेक तक्रारी येऊनही एकाही तक्रारदाराला महापालिकेकडून ५०० रूपये देण्यात आले नाहीत, असा आरोप विरोधीपक्षानं केलाय.
१ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत खड्ड्यांच्या एकूण सोळाशे तक्रारी आल्या. त्यानुसार ९१ टक्के खड्डे भरल्याची माहिती आज स्थायी समितीत महापालिका प्रशासानानं दिली.
दरम्यान या चॅलेंजनुसार २४ तासांत खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांच्या खिशातून ५०० रूपये तक्रारदारास देण्यात येणार होते. त्यानुसार २४ तासांत खड्डे न भरल्यानं ४२ हजार ५००रूपये देण्यात यावे, अशी मागणी विरोधीपक्षानं केली आहे.
१ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत खड्ड्यांच्या एकूण सोळाशे तक्रारी आल्या. त्यानुसार ९१ टक्के खड्डे भरल्याची माहिती आज स्थायी समितीत महापालिका प्रशासानानं दिली.
दरम्यान या चॅलेंजनुसार २४ तासांत खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांच्या खिशातून ५०० रूपये तक्रारदारास देण्यात येणार होते. त्यानुसार २४ तासांत खड्डे न भरल्यानं ४२ हजार ५००रूपये देण्यात यावे, अशी मागणी विरोधीपक्षानं केली आहे.