Jitendra Awhad vs Ganesh Naik | आव्हाडांच्या 'खंडणीखोर' असल्याच्या टीकेला गणेश नाईकांचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2020 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका आव्हाड यांनी केलीय. येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केलीय. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर गणेश नाईकांनीही आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.