Nashik : रामकुंडाच्या काँक्रेटिकरणामुळेअस्थींचं विघटन होत नसल्याचा आरोप, काँक्रिटिकरणामुळे नवा वाद
नाशिकच्या रामकुंडावर हजारो भाविक अस्थी विसर्जनासाठी येत असतात, मात्र इथे असलेल्या काँक्रिटिकरणामुळे सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे, रामकुंडाच्या काँक्रेटिकरणामुळे अस्थींचं विघटन होत नसल्याचा आरोप, अनेक समाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी केलाय. तर आतापर्यंत ५ कुंडांचे काँक्रीट काढण्यात आलंय. त्यामुळे झरे जिवंत झाल्याचा दावा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे रामकुंडाचे काँक्रिटिकरणही काढण्याची मागणी आता नव्यानं जोर धरु लागलीये. .
---