Nandurbar Farmer : नंदुरबारमध्ये पावसाची ओढ, वीजपुरवठ्यामुळे शेतकरी अडचणीत : ABP Majha
राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय, नंदुरबार जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली असताना शेतीसाठी अनियमित विजपुरवठा होत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. त्यामुळे पीकांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.अशा वेळी शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय.